पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी संधी द्या- रमेश पोकळे

 मावळत्या आमदारांनी बारा वर्षात काय दिवा लावला? पोकळेंचा सवाल
 
पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी संधी द्या- रमेश पोकळे

उस्मानाबाद - मराठवाड्यातील बेरोजगारांचे आणि पदवीधरांचे प्रश्न गंभीर बनले आहेत, ते सोडवण्यासाठी पदवीधरांनी मला संधी द्यावी असे आवाहन करून राष्ट्रवादी आणि भाजपा उमेदवारांना आमदारकी केवळ उद्योगाच्या संरक्षणासाठी हवी आहे. मावळत्या आमदारांनी बारा वर्षात काय दिवा लावला? असा खडा सवाल मराठवाडा शिक्षक संघ व संभाजी सेना महाराष्ट्रचे पूरस्कृत अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी येथे केला.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रचारानिमित्त  उस्मानाबाद मध्ये  ते आज  आले असता  पत्रकाराशी त्यांनी संवाद साधला. पोकळे म्हणाले की, सरकारच्या दिशाहीन धोरणामुळे दिवसेंदिवस पदवीधरांचे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत ते सोडवण्यासाठी मला संधी द्यावी. मावळत्या आमदारांनी मराठवाड्याच्या गुणवत्ता वाढीसाठी विधीमंडळात न बोलता शैक्षणीक संस्थांना राजकीय अड्डा बनवण्याचे काम केले. बारा वर्षात पदवीधर आणि बेरोजगारांच्या प्रश्नावर काय दिवा लावला? हे जाहीर करावे असे आव्हान दिले.

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला शिक्षण क्षेत्राची माहिती नाही. पक्षाचे दोन्ही उमेदवार घोटाळा खोर आहेत त्यांना पदवीधरांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. मी भाजपा नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सहवासात वाढलेला सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाकडे माझे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन मी उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाने उमेदवारी जाहीर करण्यात कोणते निकष लावले हे मात्र कळत नाही. माझी उमेदवारी मी पदवीधरांच्या आग्रहास्तव आणि मतदारांच्या पाठबळावर निश्चित केली आहे.

 संपूर्ण मराठवाड्यात आपल्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळत असून,विविध राजकीय पक्षातील असमाधानी नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याचा हात पुढे येत आहे. त्यामुळे दोन्ही राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकु लागली आहे. माझ्या उमेदवारीला माझे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन मराठवाडा शिक्षक संघाने आणि संभाजी सेना महाराष्ट्र यांनी जाहीर पाठिंबा दिला असल्यामुळे, मी या निवडणुकीत निश्चितपणे विजय होणार असल्याचा विश्वासही  पोकळे यांनी व्यक्त केला. 

विद्यमान आमदारांचे शिक्षणाऐवजी टक्केवारीवर लक्ष

मराठवाड्यातील बेरोजगारांचे आणि पदवीधरांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. शिक्षण क्षेत्र आणि पदवीधरांच्या न्याय्य हक्कासाठी 22 वर्षापासुन माझा लढा सुरू आहे. या लढ्याला मुहूर्तरूप देण्यासाठी पदवीधर मतदारांनी मला निवडणुन द्यावे असे आवाहन करत विद्यमान आमदारांनी मराठवाड्याच्या शैक्षणीक गुणवत्तेवर लक्ष देण्याऐवजी गुत्तेदारीच्या टक्केवारीवर लक्ष दिले असल्याचा घणाघात रमेश पोकळे यांनी यावेळी केला.

भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला शिक्षण क्षेत्राची जाण नाही, प्रश्न माहिती नाही, त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात योगदान काय? दोन्ही पक्षाचे उमेदवार घोटाळा खोर आहेत त्यांना पदवीधरांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. मी भाजपा नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सहवासात वाढलेला सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाकडे माझे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन मी उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाने उमेदवारी जाहीर करण्यात कोणते निकष लावले हे मात्र कळत नाही. माझी उमेदवारी मी पदवीधरांच्या आग्रहास्तव आणि मतदारांच्या पाठबळावर निश्चित केली आहे. असे स्पष्ट केले.

संपूर्ण मराठवाड्यात आपल्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळत असून,विविध राजकीय पक्षातील नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याचा हात पुढे येत आहे. मराठवाड्यातील हजारो अदृश्य हात माझ्या विजयासाठी प्राचारात सक्रिय आहेत. त्यामुळे दोन्ही राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकु लागली आहे. माझ्या उमेदवारीला माझे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन मराठवाडा शिक्षक संघाने आणि संभाजी सेना महाराष्ट्र यांनी जाहीर पाठिंबा दिला असल्यामुळे, मी या निवडणुकीत निश्चितपणे विजय होणार असल्याचा विश्वासही पोकळे यांनी व्यक्त केला.यावेळी मरावाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस व्ही.जी.पवार,बीड जिल्हा सचिव राजकुमार कदम,बाळकृष्ण थापडे उपस्थित होते.

From around the web