वादग्रस्त पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांची सोलापूरच्या ट्रेनिंग सेंटरला उचलबांगडी 

 उस्मानाबाद लाइव्हचा दणका 
 

 
s

उस्मानाबाद - उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यामुळे आनंदनगर पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक सतीश शाहू चव्हाण यांची सोलापूरच्या ट्रेनिंग सेंटरला उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांचा प्रभारी चार्ज जालन्याहून आलेल्या जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. 


आनंदनगर पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक सतीश शाहू चव्हाण यांच्याबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यांची सोलापूरला बदली झाली असतानाही त्यांना रिलीव्ह करण्यात आले नव्हते, त्यामुळे त्यांचे प्रताप वाढत चालले होते. 

गेल्या चार दिवसात त्यांनी दोन प्रताप केले. एका पान टपरीवर उभारलेल्या एका तरुणास बेदम मराहण केली होती तर चोरीची फिर्याद देण्यास गेलेल्या दोन तरुणावर खोटा गुन्हा दाखल केला होता. हे दोन्ही प्रकरणे फक्त उस्मानाबाद लाइव्हने उचलून धरले होते. बाकी पत्रकार झोपले होते. 

उस्मानाबाद लाइव्हच्या दणक्यानंतर वादग्रस्त पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांची सोलापूरच्या ट्रेनिंग सेंटरला उचलबांगडी करण्यात आली आहे. 


प्रकरण १

उस्मानाबादच्या आनंदनगर पोलिसांचा तालिबानी कारभार ( Video )

शहरातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका पान टपरीवर शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फरीद शेख ( वय २६, रा. समर्थनगर )  हा तरुण उभारला होता. यावेळी आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण आणि त्यांचा चालक पठाण आले आणि त्यांनी  टपरी चालकास पान-सुपारीची मागणी केली 

यावेळी अन्य दोन ग्राहक उभारले होते. पान टपरी चालकास पान देण्यास उशीर झाल्याने पोलीस निरीक्षक चव्हाण यांचा चालक मुक्रम पठाण याने ' तुला साहेब दिसत नाहीत का ? तुला पोलिसांचा इंगा दाखविला पाहिजे असे म्हणून अश्लील शिवीगाळ सुरु केली. 

यावेळी टपरी चालकाचा मित्र फरीद शेख याने पठाण यास शिवीगाळ करू नका म्हणून मध्यस्थी केली असता, तू मध्ये पडू नको म्हणून पठाण याने त्यासही शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर त्याने पोलीस गाडीत बस म्हणून जबरदस्तीने गाडीत बसविले आणि आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये नेले. 

आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक चव्हाण,  मुक्रम पठाण आणि अन्य दोन पोलिसांनी फरीद शेख  यास लाथाबुक्यांनी आणि बेल्स्टने डोक्यावर आणि हातापायावर रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली. 


प्रकरण २ 

चोरीची फिर्याद देण्यास गेलेल्या दोन तरुणावर खोटा गुन्हा दाखल

उपळे ( मा. ) येथील महेबूब इलाही शेख याचे आरटीओ ऑफिससमोर मैत्री ऑनलाइन सर्व्हिस सेंटर आहे. दि. १७ ऑगस्टच्या मध्यंतरी या सेंटरमध्ये चोरी होवून कॉम्प्युटर आणि रोख रक्कम चोरीस गेली. या चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी महेबूब इलाही शेख हा तरुण १८ ऑगस्ट रोजी सकाळी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गेला असता, बिट अंमलदार घटनास्थळी भेट दिल्यानंतर गुन्हा दाखल करतील, असे सांगितले. 

त्यानंतर बिट अंमलदार बोचरे यांनी घटनास्थळी भेट देऊन गेल्यानंतर महेबूब इलाही शेख आणि त्यांचा मित्र राहुल रणजित रोडे हे दुपारी चारच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये गेले असता, मुंडे मॅडम यांनी, तक्रार न घेता, "माझे आयुष्य लोकांची  घाण काढण्यातच चालले" म्हणून तुम्ही दुकानाच्या रक्षणासाठी वॉचमन ठेवायचा असा सल्ला दिला. 

त्यानंतर मुंडे मॅडम यांनी,  सपोनि भारत बलैय्या बलैया यांच्याकडे घेऊन गेले असता, त्यांनीही फियादीस अर्वाच्च भाषा वापरली . यावेळी मुंडे मॅडम यांनी चव्हाण साहेब आल्यानंतर त्यांना विचारून तक्रार घेते म्हणून चोरीची तक्रार घेण्यास नकार दिला. सायंकाळी पोलीस निरीक्षक चव्हाण आले असता, त्यांनीही फिर्यादीस चोरीला गेलेलं सामान आणि पैसे तुझ्या तू शोध म्हणून तक्रार घेण्यास नकार दिला. 


 त्यानंतर महेबूब इलाही शेख आणि त्यांचा मित्र राहुल रणजित रोडे हे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यासाठी जात असताना, बिट अंमलदार बोचरे यांनी मध्येच फोन करून साहेब तुझी तक्रार घेण्यास तयार आहेत म्हणून परत पोलीस स्टेशनला बोलावले, त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली पण फियादी  वरिष्ठ अधिकाऱ्याकडे का गेला याचा राग मनात ठेवून फियादीवरही शासकीय गुपिते अधिनियम १९२३ च्या कलम ३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलाम १२० प्रमाणे गुन्हा दाखल करून आपले खरे रूप दाखवले. फिर्यादी  महेबूब इलाही शेख आणि त्याचा मित्र राहुल रणजित रोडे  हे शासकीय नोकरीसाठी प्रयत्नशील  आहेत. हा खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या चारित्र्य प्रमाणपत्रावर गदा आली आहे. 


 

From around the web