वानेवाडी :  विद्यार्थांच्या मृत्यू प्रकरणी अखेर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

 
f

धाराशिव - धाराशिव तालूक्यातील वानेवाडी येथील एका अध्यामिक आश्रमशाळेत दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे शनिवारी रात्री उघडकीस आले होते.  आशमशाळेचे संस्थापक आणि अध्यात्माचे धडे देणाऱ्या महाराजांनी बेदम मारहाण करून नंतर त्यास गळफास दिल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी  केला होता. याप्रकरणी ढोकी पोलिसानी आज ( रविवारी ) पाच  जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.  या मुलाची आत्महत्या आहे की खून करून नंतर प्रेत झाडास लटकवण्यात आले, याचा शोध पोलीस घेत आहेत. हे प्रकरण धाराशिव लाइव्हने सर्वप्रथम उघडकीस आणले आहे. 

g

वाणेवाडीचे तथाकथित महाराज : मुंह में राम बगल में छुरी ...

धाराशिव तालूक्यातील वानेवाडी येथे तथाकथित महाराज काका उंबरे  यांची अध्यात्माबरोबर शिक्षण देणारी आश्रमशाळा आहे. त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाना हे महाराज शेतातील  आणि घरची कामे लावत होते आणि कामे न केल्यास बेदम मारहाण करीत होते. वाखवाडी येथील प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) हा दहावीच्या वर्गात शिकत होता. त्यास शेतातील  कामे न केल्यामुळे बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याने झाडास  गळफास घेऊन आत्महत्या शनिवारी सायंकाळी उघडकीस आले , त्याच्या हातापायावर जखमा आढळून आल्याने हा खूनच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यास बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी नंतर त्याचे प्रेत झाडास लटकवण्यात आल्याचे मयताचे वडील  लहू शिवाजी शिंदे यांचे म्हणणे आहे. 

f

लहू शिंदे यांच्या फिर्यादीवरून संस्थाचालक काका उंबरे, गोपाळ महाराज, प्रशांत मारुती नांदे,माउली महाराज उंबरे  आणि मनोहर झ्क्के  यांच्यावर ढोकी पोलीस स्टेशनमध्ये भादंवि ३०५, ३२४,३२३ ,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३०२ नुसार गुन्हा दाखल  करण्याची मागणी होत आहे. दरम्यान , या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी होत आहे. 

काय आहे तक्रार ? 

याप्रकरणी मयत मुलाच्या वडिलाने ढोकी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, 'माझा मुलगा प्रेम हा एक महीन्यापूर्वी कोणाला काही न सांगता घरी वाखरवाडी येथे सकाळी ६ वा. सुमारास आला होता. त्यावेळी त्यास घरी कोणालाही काही न सांगता का आलास असे विचारले असता त्याने मला नांदे महाराजांनी शेतात काम न केल्यामुळे खूप मारले आहे असे सांगितले. काका महाराज उंबरे हे आश्रमाच्या शेतात खूप काम करायला लावतात व इतर महाराज काम नाही केले तर मारहाण करतात व रागावतात. त्यांची मला भिती वाटत आहे असे सांगितले होते.''त्यांनतर मी त्यास परत त्याच दिवशी वानेवाडी येथील आश्रमामध्ये सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नेऊन सोडले होते. मी महाराजांना कशाबदल मारहाण केली आहे असे विचारले असता त्यांनी सांगितले होते की, तो आश्रमामधून पळून जायचे म्हणत होता म्हणून मारहाण केली होती असे सांगितले होते. मी त्यांना परत मारहाण करू नका विश्वासात घेऊन शिकवा असे बोलून गावी आलो होतो.' 'त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी तुमचा मुलगा प्रेम हा रात्री १०.३० वाजल्यापासून आश्रमामधून बेपता आहे अशी माहिती मला मिळाली. त्यांनतर मी आश्रमामधील नांदे महाराज यांना फोन करून विचारले की, प्रेम कोठे आहे? त्यावर ते मला म्हणाले की, मी ढोकी येथे बघायला आलो आहे. तो आश्रमामधून कोठेतरी निघून गेला आहे असे सांगितले होते.

de

'त्यांनतर आमच्या गावातील पोलीस पाटील अजीत शिंदे यांनी फोन करून सांगितले की, दादा तुमच्या मुलाने आश्रमाजवळील शेतातील झाडास गळफास घेतल्याचे समजले आहे असे सांगितले. त्यानंतर मी माझे मोटारसायकलवर बसून दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आश्रमामध्ये गेलो होतो. मी त्यांना रडत कोठे आहे मुलगा माझा असे विचारले असता तेथे नांदे महाराज, काका महाराज उंबरे, माउली महाराज उंबरे, पोलीस पाटील वाणेवाडी अरे हजर होते. त्यांनी मला मुलगा प्रेम गळफासाने लटकत असलेल्या चिंचेच्या झाडाजवळ नेऊन दाखविले.विद्यार्थी व लोकांना विचारपूस केली असता मला समजले की, दि. ४ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आश्रमातील मुलगा मनोहर किशनराव इसके (रा. पेगरगव्हाण ता.जि. परभणी) याने माझे मुलाने पैसे चोरल्याचे कारणावरून त्यास काठीने खूप मारहाण केली आहे. तसेच त्याच्या गालात चापटा मारल्या आहेत असे सांगितले होते.

श्री संत नारायण बाबा रामजी बाबा अध्यात्मिक शिक्षण संस्था (वाणेवाडी ता. जि. धाराशिव) येथे अध्यात्मिक शिक्षण घेत असतांना त्यास आश्रमातील मुलगा मनोहर किशनराव इक्के (रा. पेगरगव्हाण ता. जि. परभणी) याने पैसे चोरल्याचे कारणावरून काठीने व चापटाने मारहाण केलेली आहे. तसेच काका महाराज उबरे (रा. वाणेवाडी ता. जि. धाराशिव), प्रशांत मारुती नांदे (रा. चिंचोली ता.जि. लातुर), गोपाळ महाराज माउली महाराज उंबरे (रा. वाणेवाडी) यांनी शेतात काम का करत नाही या कारणावरून कशानेतरी बेदम मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या त्रासास व जाचास कंटाळून माझा मुलगा प्रेम शिंदे याने त्याचे जीवन संपवले  आहे.
 

 

 

From around the web