सीबीआय, ईडी यांच्या कारवाई अगोदरच भाजपच्या कार्यकर्त्यांना कशा माहीत होतात - खा.सुप्रिया सुळे 

८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मोदी सरकारची महागाईची सर्वात मोठी भेट
 
d

उस्मानाबाद  - केंद्रीय स्तरावर सीबीआय, ईडी या यंत्रणा स्वायत्त असणाऱ्या संस्था आहेत. त्यामुळे त्यांचा कारभार अतिशय पारदर्शक होणे अपेक्षीत आहे. परंतू राज्यातील मंत्र्यावर व इतरांवर सीबीआय किंवा ईडी कारवाई करणार असेलेल्या भाजपच्या नेतेमंडळींना एक महिना, पंधरा दिवस व आठवडा अगोदरच कशा माहिती होतात ? असा सवाल करीत थेट केंद्र सरकार व सत्ताधारी भाजपच्या मंडळींना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. याच आधारे भाजपचे काही नेते माध्यमांशी बोलून राज्यातील मंत्री व इतरांवर आरोप करतात. विशेष म्हणजे त्यानंतर ईडी किंवा सीबीआय संबंधितावर करवाई करते. हा काही स्वायत्त असलेल्या संस्थेचा पारदर्शक कारभार नाही. याचा जाब मी संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारणार आहेच. तसेच मोदी सरकारला सत्तेवर येऊन ८ वर्षाचा काळ पूर्ण झाला आहे. या काळामध्ये देशातील नागरिकांना प्रचंड मोठ्या महागाईची भेट त्यांनी दिली असल्याची जळजळीत टीका करीत घड्याळाच्या काट्यांद्वारे हल्ला मोदी सरकार व भाजपावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकार परिषदेत  केला.


उस्मानाबाद येथील सर्कीट हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार, जीवनराव गोरे, आ. विक्रम काळे, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील, माजी आ. राहुल मोटे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, वैशालीताई मोटे, संजय निंबाळकर, कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, नितीन बागल, नंदकुमार गवारे, अमित शिंदे, मसूद शेख आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना खा सुळे म्हणाल्या की,  जिल्ह्यातील राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी राज्य पातळीवरील काही पदे देणार का ? यावर ही त्यांनी गोलमोल उत्तरे दिली. पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे माजीमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांनी पक्षाला व शरद पवार यांना ५ दशके दिलेली साथ व ऋणानुबंध आयुष्यभर विसरू शकत नाही. तसेच राजकारण व नाती हे संबंध हे वेगळे असून ते जपायलाच पाहिजेत. मला त्या सगळ्यांचीच कमतरता जाणवली अशा भावना व्यक्त करीत त्यांनी नात्याच्या संबंधाला उजाळा दिला. तर मी गेल्या ४ दिवसांपासून मराठवाड्यातील परभणी, लातूर‌ व उस्मानाबाद या जिल्ह्याचा दौरा करीत आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, देशमुख यांच्यावर ईडीने १०९ वेळा धाडी टाकण्याचा विक्रम केला असून हा आरोप करणाऱ्यास माफीचा साक्षीदार केले. तर दुसरा फरार झाला. त्यामुळे सत्याचा विजय झाला असून अखेर... सत्यमेव जयते... असे त्यांनी सांगितले.

तेरला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र

मराठवाडा ही संताची भूमी असून येथे अनेक  ऐतिहासिक मुर्त्यांचा ठेवा आहे. तेर येथे मोठ्या प्रमाणात पुरातन विभागाच्या माध्यमातून उत्खनन करण्यात आले असून त्याद्वारे सापडलेल्या वस्तूंचे संग्रहालय बांधण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी येणार्या पर्यटकांना ८-१० दिवस थांबता यावे यासाठी   आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र येथे होऊ शकते, असे सांगून खा. सुळे यांनी तेर येथील संत गोरोबा काका मंदीरास आपण भेट दिली व ऐतिहासीक ठेवा ही आपण पाहिला आहे. त्यासंदर्भातील विकासनशील आराखडा अापण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ते पत्र द्या पाठपुरावा करते 

यावेळी केंद्र सरकारने सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाबाबात आतापर्यंत ३२ कोटी रुपये दिले आहेत. परंतू राज्य सरकार आपला ५० टक्के वाटा देत नाही. या संदर्भात आ. राणाजगजितसिंह पाटील नेहमीच आरोप करतात. याबाबत विचारले असता खा. सुळे यांनी आ. पाटील यांनी राज्य सरकारला विचारणारे पत्र माझ्याकडे द्या, मी पाठपुरावा करते, असे सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी राज्य पातळीवरील काही पदे आपण देणार का ? असे विचारले असता त्यांनी गोलमोल उत्तर देत याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

From around the web