युद्धग्रस्त युक्रेनहून सुखरूप वापस आलेली उस्मानाबादची निकिता थिटे म्हणाली...

उस्मानाबाद - युक्रेन -रशिया युद्धामुळे भारतातील हजरो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ विद्यार्थी आहेत.त्यापैकी काल ढोकी येथील निकीता निवृत्ती थिटे ही सुखरूप घरी पोहचल्यावर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी निकीताच्या घरी जाऊन तिची भेट घेतली व सुखरूप घरी परतल्यामुळे तिचा यथोचित सत्कार केला.
युक्रेन येथे वैद्यकिय शिक्षण अल्पदरात होते त्यामुळे अनेक देशातील विद्यार्थी येथे वैदयकिय शिक्षण घेण्यासाठी वास्तव्यास असतात, त्यामध्ये भारतातील हजारो विद्यार्थी या युक्रेन देशात अडकले होते. परंतु आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने मिशन गंगा चालू करून युक्रेनमधील सुमारे 15 हजाराहुन जास्त विद्यार्थी आज मायदेशी भारतात परत आणले.,अशी भावना निकिता थिटे हिने व्यक्त केली.
नितीन काळे यांनी निकितास घडलेल्या प्रसंगाविषयी विचारपूस केली, तेंव्हा निकीताने सांगितले कि आज भारतीय असल्याचा अभिमान वाटत असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन गंगा मुळेच विनामुल्य सुखरूप घरी पोहचु शकलो.
निकीता म्हणाली की, जेव्हा रशीयाचे बॉबहल्ले चालु होते तेव्हा बंकरमधून जीव मुठीत घेऊन 30-35 किलोमिटर चालत आम्ही रोमानिया बॉर्डरवर आलो. आणि मग विमानात बसुन दिल्लीला आलो, तेंव्हा आम्ही सुटकेचा श्वास घेतला, त्यानंतर दिल्ली येथून पुणे येथे सोडण्यात आले आणि नंतर आम्ही आमच्या घरी आलो.
हे सर्व सांगत असताना निकीताच्या चेहऱ्यावर आपण भारतीय असल्याचे आणि या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे समाधान ठळकपणे दिसत होते. निकीता, तसेच निकीताचे शिक्षक आईवडील यांनी मोदी सरकारचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी भाजपाचे निहाल काझी, प्रमोद देशमुख, झुंबर बोडके, ओम नाईकवाडी, नामदेव नायकल तसेच पदाधिकारी व निकीताचे कुटुंबीय उपस्थित होते.