प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 

 
pik vima

धाराशिव  - खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणेसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत  www.pmfby.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी अर्ज घेणे सुरु आहे. चालू खरीप हंगामात पिक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दिनांक 31 जुलै 2023 ही आहे.

 पिक विमा योजना हि कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असुन कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करणे बाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे. जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के व नगदी पिकासाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आलेला असला तरी सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.  

या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी प्रती अर्ज केवळ .1/- रुपया भरुन पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे तर शेतकरी हिस्यातील उर्वरीत पिक विमा हप्त्याची रक्कम राज्य शासन भरणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे किंवा पेरणी करावयाची आहे अशा त्यांनी शासन निर्णयानुसार एक रुपयात विमा अर्ज सादर करावेत. ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे ते पिक शेतात पेरल्या बद्दलचे स्वयंघोषणापत्र, सात बारा, 8 अ, उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक च्या झेरॉक्स प्रतिसह नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर मधून किंवा शेतकऱ्याकडे स्वत: ची सोय असल्यास विमा हप्ता भरुन पिक संरक्षित करावे.

तरी  शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आत्ताच पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे अवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

From around the web