बाधित शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतीत डकवा...

- आ. राणाजगजितसिंह पाटील
 
asd

उस्मानाबाद - जिल्ह्यात जुलै महिन्यापासून झालेली अतिवृष्टी, सततचे पर्जन्यमान, गोगलगाई, यलो मोझाईक व इतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे ३३% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेली यादी ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पात्र असलेल्या बाधित शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव असल्याची खातरजमा करावी व नसल्यास तहसीलदारांकडे अर्ज करून पोहोच घ्यावी असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेले आहे.

 
जुलै महिन्यापासून झालेली अतिवृष्टी, सततचे पर्जन्यमान, गोगलगाई, यलो मोझाईक व इतर रोगाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील पिकाचे खास करून सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवलेली आहे. १५ सप्टेंबर २०२२ पासून अनुदानाची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घोषित केले आहे. 

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये म्हणून पंचनामे झालेली यादी ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सर्व सरपंचांनी पंचनामा झालेल्या पात्र असलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त करून ग्रामपंचायतीच्या फलकावर डकवाव्या जेणेकरून शेतकऱ्यांना आपली नावे त्यामध्ये असल्याचे खातर जमा करता येईल. पात्र असलेल्या परंतु यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करून त्याची पोहोच घ्यावी, असे आवाहन राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेले आहे.

From around the web