महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थींना आवाहन

 
d

उस्मानाबाद :-  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणा-या शेतक-यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे. या योजनेतर्गत जिल्हयामध्ये बँकांनी  71 हजार 740 लाभार्थी शेतक-यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यापैकी जिल्हयातील 607 गावांतील 40 हजार 483 लाभार्थी शेतक-यांची पहिली यादी दि.13 ऑक्टोबर 2020 रोजी योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. पोर्टलवर अपलोड केलेल्या 71 हजार 740 शेतक-यापैकी अजुन 31 हजार 257 शेतक-याची यादी लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे.

प्रसिध्द झालेल्या यादीतील 40 हजार 483 शेतक-यापैकी आजअखेर 35 हजार 872 शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. त्याअंतर्गत आज दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 01.30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री, यांच्या अध्यक्षतेखाली आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतक-यांच्या खात्यावर लाभाची रक्कम वर्ग करण्याबाबत कार्यक्रम घेण्यात आला आहे-आणि  लाभार्थ्याच्या बचत खात्यावर रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

तरी लाभार्थी यादीतील ज्या शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यानी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पुर्ण करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.सचिन ओम्बासे  जिल्हाधिकारी आणि  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था उस्मानाबाद यांनी केले आहे.

From around the web