कोरोना : महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी

 
कोरोना : महाराष्ट्रात आजपासून  संचारबंदी

मुंबई - महाराष्ट्रात को रोनाचा विळखा वाढत चालला आहे. त्यामुळे   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  

महाराष्ट्र कोरोनाच्या  धोकादायक उंबरठ्यावर आहे. बिकट परिस्थिती आणायची नसेल तर सरकारचे निर्देश काटेकोरपणे ऐका असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ती भीती लक्षात घेऊच आपण संचारबंदी लागू करत आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. 

आजपासून जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. हा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागतो आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातली सगळी प्रार्थनास्थळंही बंद करण्यात आली आहेत. फक्त पुजाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आत्ता जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणली नाही तर जगभरात जसं करोनाचं थैमान माजलं आहे तसंच ते महाराष्ट्रातही माजेल. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतो आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. 
काय काय सुरु राहणार?
  • जीवनावश्यक वस्तूंची दुकानं
  • शेती निगडीत औषधांची दुकानं सुरु राहणार
  • किराणाची दुकानं
  • मेडिकल्स
  • दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
  • दवाखाने, रुग्णालयं

From around the web