कोरोना बाधित तिन्ही रुग्णांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह

 
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी समाधानकारक बातमी 

कोरोना बाधित तिन्ही रुग्णांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह

उस्मानाबाद - कोरोनाच्या संदर्भात उस्मानाबाद जिल्ह्यासाठी समाधानकारक बातमी आहे. जिल्ह्यातील तिन्ही कोरोना बाधित रुग्णांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या तिन्ही रुग्णांचा दुसरा स्वॅब आज पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, तो निगेटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले.



उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यात उमरगा तालुक्यातील दोन आणि लोहारा तालुक्यातील एका  रुग्णाचा समावेश आहे. त्यांच्यावर उमरगा उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांचा  स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता पुन्हा एकदा त्यांचे स्वॅब  तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.  दुसरा  रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले.

उस्मानाबाद जिल्हा ऑरेंज झोन मध्ये  

कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन,15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन म्हणजेच हरित पट्टयात समाविष्ट होतील.



उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत  तीन कोरोना बाधित रुग्ण असल्याने हा जिल्हा ऑरेंज झोन मध्ये येणार आहे. विशेष म्हणजे या तिन्ही रुग्णांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. २० एप्रिल नंतर राज्य सरकार लॉकडाऊनच्या काही अटी शिथिल करणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात काही अटी शिथिल होण्याची अपेक्षा आहे.


इतर जिल्ह्यातील लोकांना उस्मानाबाद जिल्ह्यात येण्यास बंदी केल्यास आणि सोशल डिस्टन्सिंग पाळल्यास हा जिल्हा कोरोना मुक्त होवू शकतो. लोकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये तसेच तोंडावर आणि नाकावर मास्क आणि रुमाल बांधावा,  असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी केले आहे. 

From around the web