कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २४ तासात तिघांचा बळी

 
कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २४ तासात तिघांचा बळी


उस्मानाबाद-  जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाने तीन जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू  झाला असून कोरोनाचा मृत्यू दर पाच पेक्षा जास्त गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


आज मृत्यू पावलेल्या व्यक्तींची माहिती 

१) 60 वर्षीय महिला, रा. उंबरे गल्ली, उस्मानाबाद.
२) ६० वर्षीय पुरुष डाळींब ता उमरगा
३) ४८ वर्षीय पुरुष केसर जवळगा ता उमरगा

➤ आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या - ५८३
➤ रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या - १९७
 ➤ रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या - ३५५
➤आज पर्यंत एकूण मृतांची संख्या - ३१


 वरील माहिती. दि  22/07/2020 रोजी सायंकाळी 7:00 वाजेपर्यंत ची आहे.

From around the web