धाराशिव शहरात जलद कृती बल व पोलीस दलाचे पथसंचलन

 
s

 धाराशिव -  जिल्ह्यात आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, ईद मिलाद, दिपावली, आदी सह सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावेत, या दरम्यान कुठल्याही जाती धर्मानमध्ये तेढ निर्माण होवू नये. सर्व सण उत्सव सर्व समाज घटकांनी एकत्रीत रित्या आंनदाने साजरे करावेत. यासाठी जलद कृती बल (रॅपीडॅक्शन फोर्स) व शहरातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदारासह धाराशिव  शहरात पथसंचलन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध भागात पुढील पाच दिवस सदरचे पथसंचलन पार पडणार आहे.

          समाज विघातक/असामाजिक प्रवृत्तींमुळे समाजात धार्मीक असहिष्णुता पसरुन सार्वजनिक शांतता भंगाच्या दुर्देवी घटना देशभरात यापुर्वी अनेकदा घडल्या आहेत. येणाऱ्या आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव आणि नजीकच्या काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या शांततेत भयमुक्त वातावरणात पार पाडल्या जाव्यात व या दरम्यान समाज कंटकांकडून सार्वजनिक शांततेचा भंग होवू नये, त्यांच्यावर जरब निर्माण व्हावी आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित राहवी, या उद्देशाने उस्मानाबाद शहरातील विविध संवेदनशील भागांतुन जलद कृती दलासह धाराशिव  पोलीस दल यांचे संयुक्त पथसंचलन करण्यात आले. यावेळी धाराशिव शहरातील काळा मारुती चौक- माउली चौक- बाजार चौक- विजय चौक- तालिम चौक- शम्स चौक- मदिना चौक- दर्गा परिसर- वैराग नाका- खिरणी मळा- कुरेशी गल्ली या संवेदनशिल भागात रुट मार्च काढण्यात आला व या दरम्याण जनतेशी संवाद साधण्यात आला.

     पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखली, अप्पर पोलीस अधीक्षक . नवनीत कॉवत, जलद कृती (रॅपीडॅक्शन फोर्स) दलाचे डेप्युटी कमांडंट  यादव, कंपनी कमाडंर कृष्ण कुमार चंद्रा, उस्मानाबाद शहर विभागाचे पोलीस उप अधीक्षक  स्वप्नील राठोड, उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे प्राभारी अधिकारी  उस्मान शेख, आनंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी  प्रविण बांगर यांचे सह जलद कृती बलाचे 60 जवान व उस्मानाबाद शहर पोलीस दलाचे 30 अधिकारी व अंमलदार असे सदर पथसंचलनात सहभागी झाले.

From around the web