कर्ज मुक्ती योजनेतील उस्मानाबाद जिल्ह्याची सातवी यादी प्रसिध्द

 
कर्ज मुक्ती योजनेतील उस्मानाबाद जिल्ह्याची सातवी यादी प्रसिध्द

उस्मानाबाद - राज्य शासनाने  राज्यातील शेतक-यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 ही यापूर्वीच जाहीर केली असून या योजनेची अंमलबजावणी जिल्हयात सुरु आहे. योजनेअंतर्गत आज 475 गावातील 2625 पात्र लाभार्थ्याची सातवी यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे,अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक यांनी आज येथे दिली आहे.

    आज अखेर एकूण 73082 लाभार्थी शेतक-याच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यापेकी दि. 04 जानेवारी-2021 पर्यंत 68777 शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे.त्यापैकी 68281 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर रक्कम 494 कोटी 96 लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने चालू आहे. शेतक-यांना योजनेचा लाभ मिळण्याकरीता शेतक-यानी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे.आजपर्यंत जिल्हयातील 4305 शेतक-याचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे.

           ज्या शेतक-यानी अद्याप आधार प्रमाणीकरण केले नाही. अशा शेतक-यांनी सामाजिक अंतर (Social Distance) चे पालन करुन आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा. तसेच, आधार प्रमाणीकरण प्रक्रियेदरम्यान कर्जखाते रकमेत कोणतीही तफावत असल्यास रक्कम अमान्य "पर्याय उपयोगात आणण्यापूर्वी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून कर्जरकमेची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे. 

From around the web