कृष्णा - मराठवाडा प्रकल्पांतर्गत दुधाळवाडी व रामदरा तलावापर्यंतच्या कामाचा प्राधान्यक्रमात समावेश 

 
कृष्णा - मराठवाडा प्रकल्पांतर्गत दुधाळवाडी व रामदरा तलावापर्यंतच्या कामाचा प्राधान्यक्रमात समावेश

उस्मानाबाद - मराठवाड्याच्या कृष्णा खोऱ्यातील उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील अवर्षण प्रवण व तुटीच्या भागास शास्वत सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वकांक्षी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम हाती घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय  जलसंपदा विभागाने घेतला आहे. 

या प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील इतर भागातून २३.६६ अ.घ.फू. पाणी उस्मानाबाद व बीड जिल्ह्यासाठी उपलब्ध केले जाणार आहे. यामुळे १,१४,७३१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यासाठी २ व बीड जिल्ह्यासाठी १ आशा एकूण ३ उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे.

दुधाळवाडी व रामदरा तलावापर्यंतच्या कामाचा प्राधान्यकमात समावेश 

उस्मानाबाद जिल्हयासाठी महत्वपूर्ण असणारा कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्प हा मंजुर असून सदरील योजनेची कामे चालू होती. मात्र पूर्वीच्या भाजप सरकारच्या काळात सदरच्या योजनेचा निधी खर्च करण्यासाठी प्राधान्य कमाची अट असल्यामुळे करोडो रुपयाचा निधी खर्चाविना प्रलंबित होता व अखर्चित राहिला. त्यामुळे या योजनेतील कामे थांबली होती. 

उस्मानाबाद जिल्हयात शेतकरी आत्महत्या सतत वाढत असून सिंचनाचा कुठलाही मोठा प्रकल्प नसल्यामुळे तसेच जिल्हयात सततचा पडणारा दुष्काळ यामुळे ही योजना पूर्ण करण्याचे महत्त्व लक्षात घेवून खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार  कैलास  घाडगे - पाटील यांनी या योजनेचे गांभीर्य  लक्षात घेवून लोकप्रतिनिधी झाल्याच्या पहिल्या दिवसापासून या योजनेतील अडीअडचणी समजून ही योजना पूर्ण करण्यासाठी सतत शासनाकडे पाठपुरावा केला  होता. 

या  कमाचा प्रस्ताव शासनास आमदार कैलास  घाडगे - पाटील यांच्या दि . 27/04/2020 रोजीच्या पत्रान्वये व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या 21/08/2020 च्या पत्रान्वये प्रस्ताव शासनाकडे सादर केला व दि . 24/02/2020 रोजी  जलसंपदा मंत्री जयंतजी पाटील यांची भेट घेतली व दि . 25/02/2020 रोजी उपसचिव. धरणे यांची  भेट घेवून या योजनेचे महत्व व अडचणीबदद्ल माहिती दिली . या प्रस्तावास  1510.63 कोटींची आवश्यकता होती .आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच 2020 च्या आर्थिक बजेट मध्ये माजी मंत्री तथा आमदार डॉ तानाजी सावंत ,खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे - पाटील यांना रु . 800 कोटीची तरतूद करण्यासाठी यश आले. 

काल दि . 21/01/2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतजी पाटील यांनी दुधाळवाडी साठवण तलावाच्या व रामदरा साठवण तलावापर्यंतचा प्राधान्य कामात  काम घेण्यास मंजुरी दिली आहे  व याबाबतचा सविस्तर आदेश लवकरच निर्गमीत होणार आहे . त्यामुळे 2024 पर्यंत या योजनेतील 7 टी.एम.सी. पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला असून याचा फायदा जिल्हयातील सर्व तालुक्यांना मिळणार आहे व त्यामुळे 14936 दलघमी व 8973 दलघमी असे एकुण 23909 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकन्यांकडून याबद्दल आनंद व कौतुकीचा वर्षाव होत आहे .

 एकंदरीत भाजपा सरकाने या योजनेतील प्राधान्य कमाची अट रद्द होवून कामे दुधाळवाडी व रामदरी तलावापर्यंतची कामे होण्यास झालेला अडथळा दूर होवून पुढील कामे होण्यास मार्ग मोकळा झाला आहे . या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यामुळे माजी मंत्री तथा आमदार डॉ तानाजी सावंत , खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार  कैलास घाडगे - पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री  उध्दवजी ठाकरे , अर्थमंत्री तथा उपमुख्य मंत्री अजित पवार व शिवसेनेचे नेते पर्यटन मंत्री अदित्यजी ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंतजी पाटील व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त केले आहेत .

From around the web