उस्मानाबाद जिल्हा १५ ऑगस्टपासून अनलॉक
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा नवा आदेश
Updated: Aug 12, 2021, 22:04 IST
![d](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/f211241ec4464f425fad319a78d0e392.jpg)
काय आहेत नवे नियम ?
उस्मानाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यापासून लागू आलेले नियम १५ ऑगस्टपासून आणखी शिथिल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा नवा आदेश आज जारी केला आहे.
यापुढे सर्व दुकाने , उपहार गृहे , हॉटेल्स, बार रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदारांना दिलासा मिळाला आहे.