शेतकऱ्यांची निराशा करणारा व महाराष्ट्रावर अन्याय करणारा खेदजनक अर्थसंकल्प - ओमराजे 

 
शेतकऱ्यांची निराशा करणारा व महाराष्ट्रावर अन्याय करणारा खेदजनक अर्थसंकल्प - ओमराजे

उस्मानाबाद - आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांच्याकडून सादर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची, शेतकऱ्यांची व जनतेची निराशा केली आहे, अशी प्रतिक्रिया उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. 

 महाराष्ट्रात सरकार विरोधी पक्षाचे असल्याचा राग केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून दाखवून दिला आहे. नाशिक व नागपुर मेट्रो वगळता राज्याला अर्थसंकल्पातुन काहीच मिळालेले नाही. LIC तसेच IDBI व आणखीन एका बँकांचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा घाट आहे. आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला हा अर्थसंकल्प असून तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ व आसाम या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांनी तिजोरी मोकळी केली. देशाच्या अर्थमंत्री म्हणून त्यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडणे अपेक्षित होते. देशाला दिवसा स्वप्न दाखवणारी केंद्राची भुमिका घातक ठरण्याची भिती वाटते आहे. या अर्थसंकल्पात काहीही मिळालं नाही हे खेदजनक आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे ध्येय ठेवून 16 कलमी कार्यक्रमही त्यांनी जाहीर केला होता, ते तर झालच नाही. पण यावेळी तर शेतकरी अर्थसंकल्पातुन गायबच झाल्याचे दुर्देवी चित्र दिसुन आले आहे. ग्रामीण भागासह शेतकऱ्यांची निराशा करणारा व महाराष्ट्रावर अन्याय करणारा असा खेदजनक अर्थसंकल्प आहे, असेही खा. ओमराजे यांनी म्हटले आहे. 

शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प - ॲड रेवण भोसले
शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता, रेल्वे ,आरोग्य सेवा आदीसाठी  केंद्र सरकारने भरघोस निधी देऊन बजेटमध्ये प्राधान्य दिले आहे. तसेच ज्येष्ठ  नागरिक व इंधनावर कृषी अधिकारही लावलेला नाही. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हिताचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला असल्याची प्रतिक्रिया जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी दिली आहे


 

From around the web