कळंब : मांजरा धरण ७७ टक्के भरले ...

 
 कळंब : मांजरा धरण ७७ टक्के भरले ...



कळंब (विशाल कुंभार  ) - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे अनेक मध्यम प्रकल्प भरत आले आहेत. बीड, लातूर  आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील १७२ गावाची तहान भागवणा-या मांजरा धरणात आज १४ आँक्टोबर रोजी सकाळपर्यंत ७६ भरले असून, त्यामुळे लातूरकरांनी सुस्कारा सोडला आहे.. 


 यावर्षी जुन महिन्यापासूनच दमदार पावसास सुरुवात झाली असल्यामुळे मराठवाड्यात सर्वच मोठी धरणे ओसांडुन वाहत आहेत. मांजरा धरणाच्या वरच्या बाजुस नदीच्या उगमस्थानापासुन १४ बंधारे आणि लहानमोठे असे २६ तलाव  निर्माण करण्यात आल्यामुळे अलिकडील काही वर्षात मांजरा धरण भरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

    

यासर्व अडचणींचा मुकाबला करीत मांजरा नदी आणि धरण आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासर्व अडथळ्यांच्या स्पर्धेमुळे आता मांजरा धरण भरण्यास विलंब लागत आहे. आज १४ आँक्टोबर रोजी मांजरा धरणात ७६ टक्यापेक्षा ही जास्त पाणी साठा जमा झाला आहे. सध्या बेडुक नक्षत्र सुरु आहे, या नक्षत्रात चांगला पावूस पडतो असे संकेत आहेत. शिवाय कमी दाबाचा निर्माण झालेल्या पट्ट्यामुळे आपल्या भागात या चार दिवसांत सांगितलेल्या मोठ्या पावसाचा लाभ होणार अशी चिन्हे अधिक आहेत.


 मांजरा धरणाची संपुर्ण पाणी साठवण क्षमता २२४.०८३ दलघमी एवढी असून आज धरणात १७१.१८३ दलघमी पाणी साठा जमा झाला आहे. म्हणजे धरण पुर्णक्षमतेने भरण्यासाठी ५४ दलघमी पाणी साठ्याची आवश्यकता आहे. आज मांजरा नदीचा प्रवाह लक्षात घेतला तर प्रति सेकंदास ४.९१८ घनमीटर एवढे पाणी धरणक्षेत्रात जमा होत आहे. धरणक्षेत्राच्या कँचमेंट एरीयात आणखी जोराचा  पावूस झाला तरहे प्रमाण वाढु ही शकेल. मांजरा नदीची क्षमता प्रति सेकंदास १६६.४४२ घनमीटर एवढे पाणी धरणात आणण्याची आहे. त्यामुळे आजची परिस्थिती लक्षात घेतली तर धरण भरण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण येईल असे वाटत नाही.


उस्मानाबाद , लातुर व बिड जिल्ह्यात याचे सिंचन क्षेत्र आहे . हे धरण भरल्यामुळे सुमारे 18223 हेक्टर ला याचा फायदा होणार आहे . त्यामुळे शेतकरी आता सुखावला आहे . मांजरा प्रकल्प हा बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांचा प्रमुख जलस्त्रोत असणारा प्रकल्प असुन हे धरण भरल्यामुळे या वर्षी पाण्याचा प्रश्न मिटला आहे . 


कळंब तालुक्यात करंजकल्ला , कोथळा, लोहटा , खडकी , हिंगणगाव यासह काही गावे ही धरणाच्या बॅक वाँटर मध्ये येतात. मागील काही वर्षापासून धरण भरले नव्हते त्यामुळे या गावांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागले होते आणि या ठिकाणचे ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले होते मात्र आता धरण भरल्यामुळे बॅक वाँटर शिल्लक राहणार आहे त्यामुळे या गावांना चांगला फायदा होणार आहे .

From around the web