दहावी व बारावीच्या लेखी परीक्षेच्या पेपरसाठी कोविडमुळे वेळांमध्ये वाढ

 
दहावी व बारावीच्या लेखी परीक्षेच्या पेपरसाठी कोविडमुळे वेळांमध्ये वाढ

उस्मानाबाद -एप्रिल-मे 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी (इ.12वी) आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी (इ.10वी) लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि.26 फेब्रुवारी  2021 पासून उपलब्ध करून देण्यात आलेली होते.

    शैक्षणिक वर्ष 2020-2021  मध्ये कोविड-19  विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लेखी परीक्षेतील पेपरची वेळ या परीक्षेसाठी 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे व 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढविण्यात येत आहे.

      त्याअनुषंगाने एप्रिल-मे 2021 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी (इ.10वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी (इ.12वी) परीक्षेच्या वेळापत्रकात वेळेमध्ये बदल करुन सुधारित अंतिम वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दि. 21 मार्च-2021 पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

    उपरोक्त लेखी, प्रात्यक्षिक व तत्सम परीक्षांना प्रविष्ठ होणा-या परीक्षार्थ्यांसाठी कोविड 19 विषाणुच्या पार्श्वभूमीवर विशेष मार्गदर्शक सूचना मंडळामार्फत निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.परीक्षार्थ्यांनी या विशेष मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावयाचे आहे.

From around the web