उस्मानाबादेत पीक नुकसानीसंदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक

पिक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यासंदर्भात  विमा कंपनीकडे मागणी
 
s

उस्मानाबाद  - महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री .दादाजी भुसे यांच्या सूचनेनुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात  पीक नुकसानीसंदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये २० ते २२ दिवसांपेक्षा अधिकचा पावसाने खंड पडल्यामुळे खरिपाची पीके (सोयाबीन,उडीद, मूग आदी पिके) वाळली आहेत. महसूल, कृषी विभाग व पीक विमा प्रतिनिधी मार्फत चाचणी प्रयोग केली केले असून ५० टक्के पेक्षा अधिकचे उत्पन्नात घट असल्याचे विमा कंपनीने मान्य केले नव्हते. परंतु ही  समिती पाच सदस्यांची आहेव विमा प्रतिनिधीना कृषी विभागाची तांत्रिक माहिती नाही त्यांचे म्हणे नाकारले व महसूल व कृषी विभागाने केले पंचनामे व ५० टक्के पेक्षा अधिकचे उत्पन्नात घट असल्याचे मान्य केले आहे.

पावसाच्या खंडामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईच्या प्रमाणात पिक विमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्यासंदर्भात मागणी विमा कंपनीकडे होणार आहे. याबाबतची अधिसूचना काढण्याचा ठराव सर्वानुमते पास झाला आहे.

याप्रसंगी आ.कैलास घाडगे-पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बिराजदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता, विमा प्रतिनिधी आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

From around the web