उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा वकिलांचा दहा दिवसात कोरोनाने मृत्यू 

 
उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा वकिलांचा दहा दिवसात कोरोनाने मृत्यू

उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाने  हाहाकार माजवला आहे. दररोज किमान २० जण मृत्यू पावत आहेत. यात वकीलही  सुटू शकले नाहीत. जिल्ह्यात मागील दहा दिवसात कोरोनामुळे सहा  वकिलांचा मृत्यू झाला आहे. शासनाने वकिलांच्या वारसांना तात्काळ 25 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी जिल्हा विधिज्ञ मंडळचे अध्यक्ष अँड नितीन भोसले यांनी केली आहे.


फौजदारी क्षेत्रातील ज्येष्ठ व नामांकित वकील अशी राज्यभर ओळख असलेले अँड दत्तात्रय उर्फ आबा बारखडे ( वय ६२ )अँड भारती रोकडे ( वय ४६ )  अँड विनोद गंगावणे ( वय ४५  ) अँड बापूसाहेब गंजे (वय ५३  ) अँड नारायण वडणे ( वय ४५  ) व उमरगा येथील ॲड.रवींद्र बिराजदार ( वय ४४  ) या सहा जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


वकीलासाठी कसलेही सुरक्षा कवच नाही,त्यांच्या मागे वारसांना कसलीही आर्थिक सुरक्षा नाही, वकिलाचा अनेक बाबतीत थेट संपर्क पक्षकाराशी येतो त्यामुळे वकिलांना कोरोना संसर्ग जास्त आहे. वकील लोकांना तातडीने लसीकरण करण्याची गरज आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा वकिलांचा मृत्यू या लाटेत झाला आहे.अनेक वकिलांचे नातेवाईक यात बळी पडले आहेत.वकिलांच्या वारसांना शासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे. शासनाने वकिलांच्या वारसांना तात्काळ 25 लाख रुपयांची मदत करावी,  अशी मागणी जिल्हा विधिज्ञ मंडळचे अध्यक्ष अँड नितीन भोसले यांनी केली आहे.

From around the web